कर्जत/ लोभेवाडी/ मोतीराम पादीर – कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी वाड्या मध्ये मोरेवाडी ताडवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत. या दोन वाड्याना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या दोन वाड्या अजून सुदधा गरिबीशी दोन हात करतानी दिसत आहेत.ताडवाडी व मोरेवाडी या दोन वाड्यांना कितेक वर्षा पासून पाण्यासाठी वणवण इकडे तिकडे पाणी अणण्यासाठी भटकावे लागत आहे. या दोन वाड्यांना दिवस रात्र पाणी भरण्यासाठी दोन ते तीन कीलोमीटर अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे या दोन वाड्यांना पाणी घेऊन येण्यातच पूर्ण दिवस जातो यामुळे कामधंदा करण्यासाठी वेळ राहात नाही.आणि कुठे मोलमजूरी सुद्धा कोणी देत नाही. खुपच वाईट परिस्थिती व समस्या बरोबर सामना करावा लागत आहे.दोन गावाला लवकारात लवकर पाण्याची व्यवस्था करावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे.
या दोन वाड्यांनी पाण्याच्या समस्याच्या काळात बरेच काहि सोसावे लागले आहे. पाण्याच्या शोधात आपले जीव सुद्धा धोक्यात घातले आहेत ताडवाडी मधील तरुणी पाण्याचा शोध घेत आसताना विहिरीच्या कटड्यावरून पडून मृत्यू झाला. मोरेवाडी येथील व्यक्ती पाण्याचा शोध घेत असताना धरणा मध्ये पडून मृत्यू ओडावला या सारख्या घटना या दोन वाड्यांना बघायला मिळाल्या आहेत. याची दखल घेऊन जिल्हा अधिकारी डॉ विजय सुर्यवंशी यांनी पाण्याविषय समस्या व हागनदारी मुक्त समस्या लक्षात घेऊन त्या राबवण्यात याव्यात. ताडवाडी व मोरेवाडी गावाची पाहणी केली व पाण्याविषय मोठी समस्या लक्षात आली. आदिवासी वाड्यांना सन २०१८ साली नळपाणी योजना राबवण्यात आली या उपाययोजनेतून २८ लाखाची योजना मंजूर केली असताना ज्या विहिरी वरून पाणी घेयाचे होते त्या विहिरीच्या वरच्या बाजूला एका फार्म हाऊस वाल्यानी ५० फूट खोल दुसरी विहिरीचे खोदकाम केले व जुन्या विहिरीचे पाणी सर्व त्या विहिरीत जाऊन साठले जुनी विहिर उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे महिण्यात पूर्णपणे कोरडी पडते सन१९९७ -९८ साली मध्ये जी नळपाणी योजना राबवली ती फक्त एकच महिना चालली त्या नंतर हि योजना बंद झाली तशी ती परत चालू झालीच नाही आणि प्रशासनाने सुद्धा लक्ष दिले नाही मोटार सुद्धा चोरीस घेली पाईप लाईन चोरी झाली या कडे प्रशासनाने दुर्लक्ष केले या वाड्यांना आजून परत पाण्यावाचून राहावे लागत आहे. या दोन वाड्यातील महिला दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन यावे लागते. त्यांना पाणी भरण्यातच पूर्णदिवस जात आसतो ना कुठे मोलमजूरी व ना कुठे कामधंदाला जायाला मिळते अवघ्या दारिद्र या लोकांना भोगावे लागत आहे
आपला भारत देश स्वातत्र्य होऊन ७५ वर्षा पूर्ण झाले तरी आदिवासी वाड्या पाड्याना कुठल्याच सुख सुविधा मिळत नाही. रस्ता. पाणी. लाईट या सारख्या सुख सुविधा अजून काही गावांना मिळत नाहीत वाड्यातील महिलांचा डोक्यावरचा हांडा कधी कमरेवर येणार या प्रतिक्षा मोरेवाडी व ताडवाडी गावातील महिला करीत आहेत. या गावाचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा नाही तर ग्रामस्थ उपोषण करण्यासाठी बसतील. असे ग्रामस्था कडून मांगणी होत आहे. या विषय वारंवार लोक प्रतिनिधीच्या कानावर घालून सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आम्हाला लवकरात लवकर आमचे हक्काचे पाणी मिळावे आमच्या गावात नळपाणी योजना चालू करावी हि मागणी मोरेवाडी व ताडवाडी ग्रामस्थ करीत आहेत.















