नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा ‘ या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं सिब्बल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज, सोमवारी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थी आणि पालकांना अनेक सल्ले दिले. तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले. तसंच मोदींवरही टीका केली. विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. ही वेळ बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीची आहे. मोदींनी त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं ते म्हणाले.















