मुंबई (प्रतिनिधी) :- अत्यावश्यक कर्मचाऱ्यांकरीता लोकल सेवा आज पासून सुरू करण्यात आली आहे मात्र या लोकल मध्ये फक्त सरकारी नोकरदारांना प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व साधारण लोकांना या लोकल मध्ये प्रवेश नाही विशेष म्हणजे हि लोकल दर १५मिनिटानी धावेल तर दिवसाभरातून हि लोकल ७३ फेऱ्या मारणार आहे. एक लोकल मध्ये १२०० लोकांच्या ऐवजी ७०० लोक प्रवास करतील.यावेळी पोलिसांनी मागणी केल्यावर आवश्यक ते कागदपत्रे दाखवणे बंधनकारक राहणार आहे.














