नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी – भारत सरकारने रोख रकमेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबरोबर सल्लामसलत केल्यानंतर, चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाहीत- दि. 27 सप्टेंबर, 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. 18 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणारे सर्व रोख्यांचे लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.















