वरणगावं(प्रतिनिधी)- राज्यात व देशात कोरोना मूळे आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली असून मोल मजुरी करणाऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करून या मार्फत मोफत धान्य देण्यात यावे असे शासनाने सांगितले आहे.
परंतु राज्यामध्ये अंतोदय व प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत जे धान्य मिळते ते धान्य वितरित केल्या नंतरच प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य लाभार्थी यांना देण्यात यावे असा आदेश अन्न नागरी पुरवठा विभागाने पत्राद्वारे जाहीर केला आहे.
यामुळे अंकूश गायकवाड राज्य अध्यक्ष भटक्या विमुक्त बहुजन युवा संघ यांनी हा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.याबद्दल माहिती घेऊन लवकरच निवेदन सादर करण्यात येणार आहे.
कारण ज्या गरीब लोकांची रोजगार नसल्याने उपासमार होत असल्याने केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली आहे.
तरी सरकारने कोणत्याही अटी शर्ती विना सरसकट प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना लाभ द्यावा अशी मागणी भटक्या विमुक्त बहुजन युवा संघाचे राज्य अध्यक्ष अंकूश गायकवाड,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ.श्रद्धा दिलीप गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अरुण धनगर आदींनी एकापत्राद्वारे मागणी केली आहे.














