वरणगावं,(अंकुश गायकवाड):- दि. आसारामजी गुरुजी यांच्या जयंती निमित्त,कैकाडी समाज शाळा व वसतिगृहाच्या पहिल्या वर्षातील (सन.1958) विध्यार्थ्यांचा जाहीर सत्कार व कैकाडी समाज आघाडी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहेत.
औरंगाबाद शहरामध्ये 1958 साली दिवंगत आसारामजी गुरुजी यांनी कैकाडी समाज शाळा व वस्तीगृह चालू केले.सदरील समाज शाळेतील विद्यार्थी शिकून वर्ग-1 ते वर्ग-4 पर्यत नोकरीत लागले व स्वतःच्या कुटुंबाला शिकवून समाज सुशिक्षित केला. सामाजिक प्रबोधना साठी आयुष्यभर जीवांचे रान करणारे आणि विखुरलेल्या समाजाचे संघटन करून समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणारे व्यक्तिमत्त्व तसेच कैकाडी समाजाचे जीवनभर तळमळ व त्याच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रभर जनतेच्या दरबारात जोश पूर्ण गर्जना करणारा आवाज म्हणजेच आसारामजी गुरुजी यांचा असायचा.त्याचा जन्म 13 फेब्रुवारी 1930 रोजी झाला.
आसारामजी गुरुजीचे जीवन निखाऱ्या सारखे होते.त्यानीं आयुष्यभर अन्याय अत्याचार विरुद्ध लढले.त्यानीं समाजाला विचार दिला,न्याय दिला. दबलेल्या आवाजाला हक्काची जाणीव करून दिली. त्यांचा उजाळा मिळावा म्हणून व तरुणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा म्हणून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड.शिरीष आसारामजी जाधव साहेब(संस्थापक/अध्यक्ष:-कैकाडी समाज आघाडी) हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र गायकवाड(राज्य अध्यक्ष),अरुण गायकवाड(राज्य उपाध्यक्ष),शेखरजी जाधव(राज्य सचिव),विष्णू जाधव पैलवान(औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष),राजेंद्र गायकवाड(युवा अध्यक्ष),राजू जाधव पैलवान(क्रीडा अध्यक्ष),संजय गायकवाड(विदर्भ संपर्क प्रमुख),प्रमोद हजारे(पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख),भारत गायकवाड सर(मराठवाडा अध्यक्ष),मुकेश जाधव(खादेश संपर्क प्रमुख),डीगंबर ऊर्फ राजू जाधव(जळगांव),शेषराव गायकवाड(फुलंब्री),मनेश गायकवाड(वाळूज),कैलास गायकवाड(गंगापूर),समस्त कैकाडी समाज आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, मीडिया आघाडी,क्रीडा आघाडी,पदाधिकारी व सर्वं कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य.
स्थळं:- महसूल प्रबोधनी हॉल,अमरप्रित चौक,जालना रोड,”औरंगाबाद ”
दिनांक:-13 फेब्रुवारी 2021रोजी,सकाळी:-11.30 वाजता
नमन:- रामभरोसे भंजनी मंडळी,”औरंगाबाद “















