जळगाव दि.25 -खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिटयूट ऑफ मॅनजमेंट अँड रिर्सच , जळगाव येथे “दुबई मध्ये नोकरीच्या संधीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली , ज्यात सहभागी ३९४ विद्यार्थ्यांना दुबई मध्ये कोणत्या क्षेत्रात, कुठल्या प्रकारच्या किती पगाराच्या आणि त्या नोकऱ्या मिळविण्यासाठी काय तयारी करावी ह्या विषयावर दूूूबई स्थित शादाब मेमन ह्यांनी विस्तृतपणे सांगितले. ह्या वेबिनारमध्ये उत्तर महाराष्ट्रातील ३९४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेबिनारसाठी मूळ जळगावचे व सध्या दुबई येथे शिपिग आणि लॉजिस्टिक क्षेत्रात स्वतःचे व्यापार करणारे शद्ब मेमन हे मार्गदर्शक होते. त्यांनी सांगितलेल्या काही ठळक बाबी.
१. साधारणपणे ७ जूलैपासून दुबईसाठी व्हिसाची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल.
२. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना दुबईमध्ये खूप वाव आहे
३. दुबई येथे लॉकडाउन नंतर नोकरीच्या आणि व्यापाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत.
४. निर्मित, टुरिझम, इव्हेन्ट कन्स्ट्रशन आणि आयटी क्षेत्रात दुबई येथे चांगली मागणी आहे.
५. एमबीए आणि इंजिनीयरिन्गच्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे.
६. इंग्रजीवर प्रभुत्व, मेहनत करण्याची जिद्द आणि नीतिमत्तेच्या काम केल्यास दुबई येथील कंपन्या इतर देशापेक्षा लवकर पदोन्नती देतात.
७. जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर दुबईत यायचे असेल तर मी स्वतः त्यांना सर्वतोपरी मदत कारेन, असेही ते म्हणाले.
८. दुबईला क्षेत्रानुसार आणि कार्यक्षमतेनुसार पगार मिळतो पण तो इतरांच्या तुलनेत खूप चांगला असतो. भारतीय रुपया आणि दुबईचा दिरं मधला साधारण वीस रुपयांचा फरक नक्कीच फायदेशीर ठरतो.
९. व्यापार करण्यासाठी अर्थात दुबईला स्टार्ट अप करण्याची येथील सरकार शक्यतो संपूर्ण मदत करते तसेच तिथली प्रक्रिया जलद आणि सोपी आहे..
१०. ९० दिवसांच्या व्हिसासाठी साधारणपणे १४ इ १५ हजार खर्च येते तर कमी दिवसांच्या व्हिसासाठी कमी खर्च लागतो. टुरिस्ट व्हिसा लवकर मिळतो.
तरी खान्देशातील विद्यार्थ्यांनी दुबईचा पर्याय विचारात आणून तिथे नोकरी अथवा स्वतःच्या व्यापारासाठी अवश्य निवडावे असे मार्गदर्शक सूचना त्यांनी ह्यावेळी केली.
ह्या वेबिनारसाठी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शिल्पा एबेंडाळे ह्यांनी मार्गदर्शन केले तर आयोजन आणि मुलाखत ट्रेनींग एन्ड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले. दार पंधरा दिवसात रोजगारसंबंधी असेच वेबिनार अजून घेण्यात येणार असल्याचे संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे ह्यांनी ह्यावेळी सांगितले















