पाचोरा – आमदार किशोर पाटील यांनी मी केलेल्या वक्तव्याचा खुलासा करताना पुढील सात टर्म मी आराम करावा असा मला दिलेला सल्ला त्यांचा अहंकार सिद्ध करणारा असून त्यांनी आपले पाय जमीनीवर राहू द्यावे त्यांच्या या अहंकाराला याच निवडणुकीत जनता जनार्दन सडेतोड उत्तर देईल असे माजी आ.दिलीप वाघ यांनी आज दि.28 रोजी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना श्री.वाघ पुढे म्हणाले की, सत्ता येते व जाते नेतृत्वही बदलते कामेही होतात किंबहुना लोकप्रतिनिधींना कामे करावे लागतात आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आमदाराने कामे केली नाहीत व तो जनतेसमोर गेला नाही असे आमदार म्हणतात म्हणजे त्यांचे काका कै.आर.ओ. पाटील यांनी दहा वर्ष काहीच केले नाही असा अर्थ काढायचा का समाजवादी विचारसरणीच्या वातावरणात आम्ही वाढलो व तीच कृती कायम ठेवली आहे जातीपातीचे राजकारण आमच्या रक्तात नाही आपणच या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण आणले व करीत आहात गेल्या पाच वर्षात मी केलेल्या आंदोलने बहुधा आमदार विसरले आहेत बोंड आळी अनुदान, कर्जमाफी ,नुकसान भरपाई ,हल्लाबोल ,इंधन दरवाढ शेतीमालाला हमीभाव ,विद्यार्थी शिष्यवृत्ती यासाठी केलेले आंदोलन तसेच त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा समाजाबद्दल जातीवाचक संतापजनक टिप्पणी केल्याने त्यांच्या पुतळ्याचे केलेले दहन ही आंदोलने आमदारांनी विसरू नये मी केले मी केले असा टेंभा मिरवत आमदारांनी या अगोदरच्या आमदारांनी काहीच केले नाही असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे एमआयडीसी, बहुळा, हिवरा ,अग्नावती धरण ,खत कारखाना ,बस स्थानक डॉ. आंबेडकर पुतळा ,छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग ही कामे कोणी केली हे त्यांनी सांगावे भडगाव तालुक्यात माझ्या गाडीत बसायला एकही माणूस नाही पाचोरा तालुक्यातील माझे अनेक पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहे असा कांगावा करणाऱ्या आमदारांनीच तोडफोडीचे राजकारण केले आहे पण त्यांनी हे लक्षात असू द्यावे 2009 मध्ये ही स्थिती असताना मी निवडून आलो होतो तोडफोड व जातीपातीचे राजकारण गर्विष्ठ अहंकारी वृत्ती जनता खपवून घेत नाही त्यांचे उत्तर जनता याच निवडणुकीत त्यांना देईल कुणी आराम करावा व कोणी काम करावे हे जनताच ठरवेल आमदारांनी जनतेला गृहीत धरुन अहंकार मिरवू नये कै.सुपडू अण्णा,कै .के एम बापू ,कै. ओंकार आप्पा यांनीही मतदारसंघात कामे केली विकासाचे वातावरण कायम ठेवले व आमदार म्हणतात इतिहासात कोणीच कामे केली नाही एवढा गर्व व घमेंड त्यांनी जोपासू नये जिल्हाधिकारी व तत्सम शासकीय अधिकाऱ्यांचे आदेश मान्य करण्याची की त्यांची वृत्ती नाही या अगोदरही त्यांचे जात प्रमाणपत्र आता गोहिल यांचे जात प्रमाणपत्र याबाबतचा जिल्हाधिकार्यांचा आदेश त्यांनी चुकीचा वाटला व आता रिंग रोडच्या रस्त्या च्या स्थगितीचा आदेश इते हे मान्य करायला तयार नाही न्याय देवतेवर त्यांचा विश्वासच नाही विकास कामांना आमचा विरोध नव्हता व आताही नाही जे चांगले आहे त्याचे आम्ही स्वागतच केले चुकीच्या व निकृष्ट कामाबाबत जनतेच्या तक्रारींचे प्रतिनिधित्व आम्ही करतो विरोधक म्हणून ते आमचे कर्तव्य आहे त्याचे एवढे वाईट वाटून घेणे योग्य नाही जिल्ह्यात आतापर्यंत त् अनेकांनी आमदारकी व मंत्रिपद भोगले प्रचंड कामेही केली परंतु कोणीही ही कार्यसम्राट म्हणून घेतले नाही आपले आमदार स्वयंघोषित कार्यसम्राट म्हणून मिरवून घेतात याचे खरोखरच हसू येते कामे करणे लोकप्रतिनिधींचे काम असते त्यांचा एवढा अहंकार आमदारांनी जोपासू नये पाय जमिनीवरच असू द्यावे जनताजनार्दन सगळा हिशोब चुकता करते याचे भान ठेवावे असे श्री. वाघ बोलत होते.















