India vs Afghanistan 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरू येथे आज बुधवारी खेळवला जाणार आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. बंगळुरूच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सामना वेळेवरच सुरू होईल. अहवालानुसार, बुधवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये सौम्य थंडी असेल. मात्र मोहाली आणि इंदूरच्या सामन्यांमध्ये खेळाडूंना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचे कर्णधार रोहित शर्मा आज फॉर्मात येणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
















