यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या मूल्यशिक्षण अभ्यासकेंद्राचे उद्घाटन
अमळनेर ;- ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था, समाजातील वाढता भेदाभेद, चारित्रीक व नैतिक मूल्यांचे होत असलेले अध:पतन रोखण्यासाठी पून्हा मूल्यशिक्षणाचा आधार घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी वर्तमान शिक्षण प्रणालीत मूल्यशिक्षणाचा अंर्तभाव करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. सतिष भदाणे, नाशिक यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे नुकतेच मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमाद्वारे चालविले जात आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धनाच्या या प्रयत्नांची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मूल्यशिक्षणात बी.ए., डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रम सुस्र् केले असून याचे मान्यताप्राप्त अभ्यासकेंद्र म्हणून ब्रह्माकुमारीज् अमळनेर सेवाकेंद्रास मान्यता मिळालेली आहे. अभ्यासकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. सतिश भदाणे बोलत होते. देशमुख नगरस्थित सेवाकेंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजात नैतिक, चारित्रीक व इतर मूल्यांचा होणारा सतत -हास, लोप चाललेली आध्यात्मिकता आणि पर्यायाने कमजोर होत चाललेल्या कुटुंब व्यवस्था आदि समस्यां सोडविण्यासाठी अनेक सामाजिक , आध्यात्मिक पुढे सरसावल्या असून त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे शिक्षण प्रभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मूल्य शिक्षण आणि आध्यात्मिकता या विषयावर पदव्यूत्तर पदवीका आणि पदवी अभ्यासक्रम सु डिग्री करण्यात आलेला आहे. प्रवेश प्रक्रिया ब्रह्माकुमारीज्तर्फे राबविण्यात येईल व परीक्षा, निकाल, पदवी प्रदान समारंभ आदि सर्व प्रक्रिया विद्यापीठातर्फे होणार आहेत.
तत्पूर्वी अभ्यासकेंद्राचे उद्घाटन प्रा. सतिश भदाणे, नोडल सेंटर नाशिक, ब्रह्माकुमारी विद्यादीदी सेवाकेंद्र संचालिका, अमळनेर, डॉ. सोमनाथ वडनेरे माध्यम समन्वयक, नरेंद्र साळुंखे, कल्पना साळी, फॅकल्टी मूल्यशिक्षण, प्रा. संजय बडगुजर परीक्षा व प्रवेश समन्वयक, वंदना दीदी, रंजनादीदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रंसगी डॉ. सोमनाथ वडनेरे म्हणाले की, ब्रह्माकुमारीज् या विश्वव्यापी आध्यात्मिक शिक्षण संस्थेद्वारे सातत्याने मूल्यनिष्ठ सदर अभ्यासक्रमाचा लाभ वैयक्तिक मूल्यसंवर्धनासाठी तर होईलच परंतु विविध सरकारी नोक-र्यांमध्ये, शिक्षकांना, एम.एस.डब्लू, मास कम्युनिकेशन, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक यांना नोकरी बढती साठी करीयर क डिग्री इच्छिाणारे यांना होणार आहे. बारावी उत्तीर्ण ही अट बी.ए.साठी असून 12 वी पेक्षा कमी शिक्षण झालेल्यांसाठी पूर्वतयारी परीक्षा देऊन प्रवेश घेता येईल. जुलै अखेर पर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत असल्याने इच्छुकांनी संपर्क साधावा. कार्यक्रमास शिक्षण प्रेमी नागरीक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.