जळगाव (प्रतिनिधी) दि. 14 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्तलांतरित नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात उभारलेल्या शासकीय निवारागृहात आज दि.14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर सौ.भारतीताई सोनवणे, प्रांतधिकारी दीपमाला चौरे, उपमहापौर अश्विन सोनवणे,अभिषेक पाटील, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे अडकलेल्या स्थलांतरित नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवाऱ्यांमध्ये ठेवलं आहे. या निवारागृहात नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासन उपलब्ध करुन देत आहे. या निवारागृहात आज सोशल डिस्टन्स चे पालन करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन आज या नागरिकांसाठी गोड जेवणाचा पाहुणचार करण्यात आला होता.
सदर कॅम्प साठी नाथ फाऊंडेशन जळगांव, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स ,शिव सहयाद्री प्रतिष्ठान नशिराबाद , हितेश प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड , संत हरदासराम सेवा मंडळ जळगांव यांचे सहकार्याने अन्नदान करण्यात येत आहे.
तसेच आजचे अन्नदाते मा. रक्षाताई खडसे खासदार रावेर मतदारसंघ , सुनील झवर, चंदन कोल्हे, अग्रवाल नवयुवक समाज मंडळ, क्रेडाई असोसिअशन जळगांव तर्फे निर्णय चौधरी, पुष्कर नेहते तसेच श्री.सागर चौधरी (परिवर्तन न्यूज चॅनल) , तसेच मा. अश्विन सोनवणे उपमहाौर जळगांव यांनी सॅनिटायझर वाटप केले. तसेच सदर ठिकाणी महसूल प्रशासन मंडळ अधिकारी जळगाव शहर योगेश नन्नवरे , सचिन माळी तलाठी, रमेश वंजारी तलाठी वर्ग नियोजित शासकीय निवासी कॅम्प येथे तळ ठोकून आहेत. तसेच संपूर्ण नियोजन प्रमुख लोकेश मराठे कामकाज करीत आहेत.