पाचोरा, (प्रतिनिधी) – मालेगाव कडून चाळीसगाव कडे येणाऱ्या सीमा बंद करण्याची मागणी संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी शिरसाठ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, मालेगाव कडून चाळीसगाव कडे येणाऱ्या सर्व सीमा तात्काळ बंद करण्यात याव्यात कारण मालेगाव मध्ये कोरोना बाधितांची संख्या रोजच्यारोज वाढताना दिसत आहेत आणि चाळीसगाव मालेगाव हे अंतर फक्त ५५ किलोमीटर असल्यामुळे लोकांचे जाणे-येणे जास्त प्रमाणात आहे शिवाय नातेगोते भरपूर प्रमाणात आहेत आणि म्हणून चाळीसगाव तालुक्यातील व शहरातील नागरिकांना कोरुना पासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने मालेगाव कडून येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात याव्यात अशी विनंती वजा निवेदन मेहुणबारे पोलीस स्टेशन कडे केली आहे.