जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने जळगाव शहर, अमळनेर , भुसावळ आणि चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज निर्गमित केले आहे.