जळगाव,(प्रतिनिधी) शहरात रेशन दुकानदार लाभार्त्यांना पूर्ण धान्य वाटप करीत नाहीत, थंब अपडेट करण्यासाठी पैसे मागतात, रेशन कार्ड वर असलेल्या लाभार्थ्यांचे पूर्ण धान्य देत नसतात काहीना काही कारण पुढे करून धान्य कमी देतात,स्वस्त धान्य दुकाने उघडत नाहीत अशा अनेक तक्रारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल पवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार आज पुरवठा विभागाने धाड सत्र राबविले आहे.
स्वस्त धान्य दुकानदार दुकानात किती माल आला किती गेला ह्याचा हिशेब ठेवत नाहीत.तक्रार पुस्तक दुकानात न आणता घरी ठेवून कामकाज करतात स्त्रियांना वृद्धांना मुलांना रेशन न देता वारंवार त्यांना परतवून लावतात रेशनचा माल आला नाही असे खोटं बोलून लाभार्त्यांना हाकलून लावतात तसे त्यांचे व्हीडीओ चित्रण पण नागरिकांनी तयार केले होते.असेही जिल्हापुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिले होते. आज सकाळी जे दुकानदार लवकर दुकान उघडत नाही त्यांच्या दुकानावर स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनील सूर्यवंशी सोबत घेऊन शहरातील रामानंद नगर वाघ नगर हरी विठ्ठल नगर मधील दुकान न 37/2 , 37/4 या दुकानावर स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पाहणी करून लाभार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन रेशन वाटप केले व ज्याची नवे यादीत नाहीत त्यांना नावे वाढवून देण्यास सांगितले. त्यानंतर दुकान न 37/4 या दुकानावर पाहणीस गेले असता तो दारू पिऊन महिलांना रेशन वाटतो कसे तुझ्याववर लवकर कारवाई करतो अशी ताकीद दिली व त्यानंतर जिल्हाधिकारी ह्यांच्या सांगण्यावरून त्याठिकाणी पुरवठा निरीक्षक श्री तडवी ह्यांना धान्य वाटप करण्यास पाठविले त्यावेळी सदर दोन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रेशन दुकानदारांच्या तक्रारी केल्या.