चाळीसगाव (तालुका प्रतिनिधी)- संपूर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान घातल्याने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकविस दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला आहे या संचार बंदीच्या काळात गावातील पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे प्रशासनाने विशेष जबाबदारी दिल्याने गावातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील निलेश अहिरराव याचे काटेकोर पालन करत आहे.
ते पहाटे सहा वाजेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत गावात फिरणाऱ्या तरुण व ग्रामस्थांना घरात बसण्याचे आव्हान करीत आहेत महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही घराबाहेर निघू नये असे आव्हान ते करीत आहेत व त्यांच्या आव्हानाला गावातील नागरी चांगला प्रतिसाद देत आहेत गावात येणारे भाजीविक्रेते यांच्यावर त्यांची करडी नजर आहे बँकेत, किराणा दुकान, रेशन दुकान, व भाजीपाला खरेदी च्यावेळी तोंडाला माक्स लावणे, हातांना सेनेटायझर चा वापर करणे, तसेच सोशल डिस्टन ठेवण्याचे आव्हान पोलीस पाटील निलेश अहिरराव यांनी ग्रामस्थांना केले आहे त्यांच्या या कामगिरीने गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.