नवी दिल्लीः – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरे बजेट आज सादर करीत आहेत. आज सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी १६ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. या १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक, एक वस्तू, एक जिल्हा, जैविक शेती, झीरो बजेट या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
१०० जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना पंप सोलर दिले जाणार. यात २० लाख शेतकऱ्यांना जोडणार. तसेच याशिवाय १५ लाख शेतकऱ्यांना ग्रिड पंप देण्यावर भर असणार. देशात वेअर हाउस, कोल्ड हाउस स्टोरेजला नाबार्ड अंतर्गत घेण्यात येणार आहे. नव्या पद्धतीने त्याचा विकास करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांसाठी धान्य लक्ष्मी योजना आणणार. या योजनेतून महिलांना मुख्य प्रवाहात आणणार कृषि उड्डाण योजना सुरू करण्यात येणार. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय मार्गावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करणार. देशातील सर्व राज्यांशी समन्वय राखून योजना मार्गी लावणार शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू पाण्याची कमतरता असणाऱ्या १०० जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी काम करणार १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर; सौर पंप, शेतीवर गुंतवणूक या मुद्द्यांचा समावेश झिरो बजेट शेतीवर सरकारचा भर ६ कोटी शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ देणार एक वस्तू, एक जिल्हा यावर भर पंतप्रधान कुसूम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देणार. शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरू करणार दूध, फळ, मांस, मासे यांची वाहतूक केली जाणार जिल्हा स्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन दिले जाणार मत्स उत्पादन २०० लाख टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट