जनसंंघ ते भाजप कार्यकर्त्यांचा कृतद्यता गौरव सोहळा संपन्न
किशोर काळकर यांनी मांडला लेखाजोखा : शेकडो कार्यकर्त्यांचा परिवाराचा सपत्नीक सत्कार
चाळीसगांव – जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी लाठीमार सहन करत पक्षाची ध्येय धोरणे समाजापर्यंत पोहोचवली सायकली वर फिरून पुढाऱ्यांनी जनसंघ शहरासह ग्रामीण भागात वाढवला यासाठी कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले.
जनसंघ ते भाजप हा प्रवास अतिशय खडतर व मेहनतीचा होता कार्यकर्त्यांच्या जीवावर व त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच भारतीय जनता पार्टी तालुका, जिल्हा, राज्य, देश नव्हे नव्हे तर जगात एक नंबरचा पक्ष झाला असल्याची भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसंघ ते भाजप कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या कृतज्ञता व हृदय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता शहरातील पाटीदार मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी पाच वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री एड. किशोर काळकर नवनिर्वाचित भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, तालुका अध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप प्रदेश सदस्य उध्व वराव माळी महिला आयोगाच्या माजी सदस्य देवयानी ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सभापती स्मितल बोरसे ,हेमांगी ताई पूर्णपात्रे ,उमंग महिला परिवाराच्या अध्यक्ष संपदा पाटील , पस उपसभापती संजय पाटील , भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील ,एरंडोल तालुका अध्यक्ष एस आर पाटील, बाजार समिती माजी अध्यक्ष मच्छिंद्र राठोड , यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला जनसंघ ते भाजप प्रवासातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वयोवृद्ध जनसंघाचे कार्यकर्ते रामभाऊ पवार गुरुजी यांचा व त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व वडाचे झाड देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस अड.प्रशांत पालवे यांनी केले
खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की जनसंघ पासून भारतीय जनता पार्टी पर्यंतचा प्रवास आहे या प्रवासात शेकडो हजारो लाखो ज्ञान अज्ञात कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नियोजन व
प्रामाणिक प्रयत्न बळावरच पक्षाचा विस्तार झाला आहे कधीकाळी बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी असलेला भारतीय जनता पक्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात जगातला क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जळगाव जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील भूमिपुत्र नानासाहेब उत्तमराव पाटील हे जनसंघाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते तर एड.शिवाजीराव पालवे जनसंघाचे पहिले जिल्हाध्यक्ष होते या दोन्ही भुमिपुत्रा मुळे चाळीसगाव तालुक्याचे नाव भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे याचा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान आहे येत्या काळात जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला हा पक्षाचे ध्येयधोरण शासनाच्या योजना व कार्यकर्त्यांची कुशल संघटना च्या जोरावर क्रमांक एकचा जिल्हा म्हणून देशात ओळखला जाईल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की यादृष्टीने आपणास जोमाने काम करायचे असल्याची भावना खासदार उन्मेष पाटील यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी संघटन मंत्री किशोर काळकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काळातील कामकाजाचा व त्यांनी केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडला आपण भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आपल्याला अभिमान आहे एवढी पक्षाने भरभराटी घेतली आहे.असा गौरवोद्गार त्यांनी काढले यावेळी के बी दादा साळुंके, जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे,
ज्येष्ठ नेते अविनाश सूर्यवंशी यांनी आपल्या भावना मांडल्या .
कार्यक्रमात
स्वर्गीय उत्तमराव नाना पाटील, अड.शिवाजीराव पालवे ,लक्ष्मणराव गवळी ,जगन राठोड ,रमेश गवळी, नागो महणूभाव, वाडीलाल राठोड दयाराम महाजन यांच्या परिवारातील सदस्यांच्या सत्कार करताना करण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे यांच्या परिवारातील एड.प्रशांत पालवे रागीणी पालवे मनोहर आंधळे उर्मिला आंधळे यांनी कृतज्ञता सत्कार स्वीकारला याच बरोबर प्रा ल वी पाठक प्रेमचंद खिवसरा विठ्ठलराव देवकर आरती पूर्णपात्रे अविनाश सूर्यवंशी लक्ष्मणराव थोरात रंगनाथ साबळे यू डी माळी शरद साबळे आप्पा वाघ नारायण साबळे डॉ. रमेश निकम महा दु चौधरी एकनाथ चौधरी प्रकाश पोतदार सर लालचंद बजाज जितू भवानी प्रवीण वाणी अड संजय नानकर पराग कुलकर्णी श्री जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या परिवारांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस अमोल नानकर तर आभार प्रा.सुनील निकम यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक नितीन पाटील, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, कपिल पाटील, अक्षय मराठे,किशोर रणधीर अमिता सुराणा महिला आघाडीच्या डॉ.ज्योती पाटील , फयाज शेख, समकीत छाजेड, जितुभाऊ वाघ यांच्यासह भारतीय जनता पार्टी भाजप युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
साडे चार वर्षातील विकास कामाची पुस्तकाचे प्रकाशन
याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांचा विधानसभेतील कामकाजाचा आढावा व तालुक्यातील विकास कामाचे लेखाजोखा असलेले कॉफी टेबल बुक पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारी असेल असे गौरवोद्गार संघटनमंत्री अड. किशोर काळकर यांनी व्यक्त केले.