जळगाव,(प्रतिनिधी)- नमाजानंतर, मुस्लिम समुदायाने दहशतवादाविरुद्ध घोषणाबाजी केली आणि पहलगाम घटनेत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुस्लिम समुदाया चे सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख यांनी सांगितले की, दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि तो मानवतेविरुद्धचा मोठा गुन्हा आहे.निदर्शकांनी सरकारकडे दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई ची व शिक्षा देण्याची मागणी केली.
मस्जिद मध्ये झाला निषेध
शुक्रवारच्या नमाज नंतर जळगाव शहरातील व जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पहलगाव येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसेच काही उच्च शिक्षित राजकीय व सामाजिक कार्यकर्ते या भ्याळ हल्याला इस्लामिक दहशतवाद संबोधीत करीत आहे.
इस्लाम मधे दहशतवादाला थारा नाही
इस्लाम मध्ये मानव म्हणून मानवाचे अधिकार निश्चित केलेले आहेत. पवित्र कुराणात आहे की *ज्या माणसाने एखाद्या अन्य माणसाला ठार केले त्याने जणू संपूर्ण मानव जातीला ठार केले.* सर्वात मोठे पाप म्हणजे एखाद्या निष्पाप जीवाला ठार करणे होय. मानवाला जिवंत राहण्याचा अधिकार इस्लामने दिला आहे. कुराणात पुढे म्हटले आहे की आणि ज्याने एखाद्याचे जीव वाचविले त्याने जणू समस्त मानव जातीला जीवन प्रदान केले. इस्लाम धर्म हा मानवी समानता चा पुरस्कार करतो. इस्लाम धर्माने एक महान सिद्धांत प्रस्तुत केला आहे की सदाचार व ईश भिरूतेत सहकार्य करा अपकृत्य व पापाच्या बाबतीत सहयोग करू नका. इस्लाम धर्म तर शत्रूच्या प्रेतावर सुद्धा राग उतरू नये त्याचा अनादर करू नये त्याची स्थिती बिघडू नये असे आदेश देतो तो इस्लाम धर्म दहशतवादी कसा असू शकतो?
दहशत वादाला धर्म नसतो
आंतक पसरवीणारा दहशतवादी हा नावाने मुस्लिम असू शकतो परंतु तो जर तो असे कृत्य करत असेल ज्याची मनाई इस्लाम धर्माने केलेली आहे तर तो कदापी इस्लाम धर्माचा अनुयायी नसेल म्हणून अशा दहशतवाद्यांच्या कृत्याला इस्लामी दहशतवाद संबोधू नये असे आवाहन मुस्लिम समाजा तर्फे फारुक शेख यांनी केले आहे.