गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Update) कडाक्याच्या उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होतं आहे.उन्हाळी ज्वारी, मका, बाजरीसह इतर पीक काढणीवर आली असतांना राज्यात हवामानात मोठा बदल झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.हवामान विभागाने आज अनेक ठिकाणी गारपीट (Maharashtra Rain) होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
आज नाशिक, बीड, जळगाव,अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी तापमानात वाढ होईल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या गारपीट आणि पावसाचा शेतातील पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या
10th and 12th Exam Result

१०वी आणि १२वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी संभाव्य तारीख समोर आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी निकाल कसा पहावा याबाबत स्टेप्स सुद्धा आपण पाहणार आहोत.
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १० वी आणि १२ वीच्या निकालाची तयारी करण्यात येत. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळं मिळालेल्या माहितीनुसार, १२वी आणि १० वीचा निकाल गत वर्षी पेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२ वीचा निकाल (HSC Result 2025) जाहीर होऊ शकतो. तर १० वीचा (SSC Result 2025) निकाल त्यानंतर १० दिवसांत लागू शकतो.
बोर्डाच्या ‘या’ साईटवर निकाल पाहता येणार
१० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉईंट समजल्या जातो.बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ यादरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरूवातीला १२ वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
Steps to Check Maharashtra Class 12th Result Online
mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in. संकेतस्थळावर जा
“एचएससी/एसएससी परीक्षा निकाल 2025” या लिंकवर क्लिक करा.
आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाका.
‘निकाल मिळवा’ या बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह प्रदर्शित होईल.
निकालाची प्रत डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!
मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?
Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!
राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.