जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात आज राजकीय भूकंप घडला असून सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा देत हाती शिवबंधन बांधले.शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करून भाजपाला धक्का दिला उन्मेष पाटील यांच्या या निर्णयाने जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं आहे असून उन्मेष पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपा नेते संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी पहिलीच प्रतिक्रिया मानध्यमातून दिली असून त्यांनी उन्मेष पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपा नेते संकट मोचक मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पक्षाने उन्मेष पाटील यांचे तिकीट नाकारल्यावर सुद्धा ते भाजपा सोबत एकनिष्ठ राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यांना पक्षाने आमदारकी दिली, खासदारकी दिली पक्षात अजून जुने कार्यकर्ते आहेत काम करणारे, त्यांनी अजून वाट पाहायला हवी होती,भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी गेल्याने, आल्याने काही फरक पडत नाही,ते एकनिष्ठ राहणारं होते, पण ते गेले… त्यांचं मन बदललं… त्यांना शुभेच्छा देत मंत्री महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर उपरोधक टीका केली आहे.
पुढे मंत्री महाजन म्हणाले की, गेल्या निवडणुकीत जळगाव लोकसभेची जागा साडेचार लाख पेक्षा अधिक विक्रमी मतांनी निवडून आली होती यावेळेस हा विक्रमही आम्ही मोडणार आहोत. जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, मोदीजींना, भाजपाला मानणारा आहे. आता ते गेले आहेत, तर त्यांनी लढावं, घोडा मैदान समोर असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
कालपर्यंत समोर तगडा उमेदवार नसल्याने भाजप मध्ये एकतर्फी लढत होऊन स्मिता वाघ एकतर्फी निवडून येतील असे दिसत होते. मात्र उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आता हाती मशाल घेतल्याने जळगाव लोकसभेची समीकरणे बदलली आहेत. स्मिता वाघ यांच्या अडचणी वाढल्या असून लोकसभेची निवडणूक पाहिजे तशी सरळ राहिलेली नाही. स्मिता वाघ यांनाआव्हान देण्यासाठी करण पवार सारखा युवा नेता त्यांच्यासमोर असेल. त्याला उन्मेष पाटील यांची साथ असल्याने जळगाव लोकसभेत काट्याची टक्कर होणार हे निश्चित. उन्मेष पाटील यांचे समर्थक जरी भाजपा सोडणार नसले तरी ते आतून पाटील यांना मदत करतील याची जाणीव उन्मेष पाटलांना आहे.