न्यूज डेस्क – विविध राज्यांकडून विरोध होत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बदलांचे संकेत दिले आहेत. झारखंडच्या धनबाद येथील एका सभेमध्ये ते बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये या आंदोलनांना हिंसक वळण लागले. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह 7 राज्यांनी हे विधेयक आपल्या राज्यात लागू करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतरच गृहमंत्री अमित शहा यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.