नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि निर्मोही आखाड्यासहीत इतरांनी दाखल केलेल्या सर्व १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या संविधापीठीने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे अखेर अयोध्या खटला बंद झाला आहे.
संपूर्ण देशाचं लागून राहिलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचं सांगतानाच सर्वोच्च न्यायलयाने सुन्नी वक्फ बोर्डाल मशीद उभारण्यासाठी पाच एकर जागा दिली होती. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पक्षकारांकडून ९ आणि इतरांकडून ९ अशा एकूण १८ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांचा गुणवत्तेच्या आधारे विचार करून त्या फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. या घटनापीठात न्यायामूर्ती डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. अब्दूल नजीर आणि संजीव खन्ना यांचा समावेश आहे.