भुसावळ : तापी नदी काठच्या गावांसाठी मोठी बातमी आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे.यामुळे आज सकाळी 10 वाजता हतनुर धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक 06/07/2023 रोजी , हतनुर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली आहे. यामुळे आज गुरुवारी सकाळी 10.00 वा. हतनुर धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येवून 136.00 क्युमेक्स (4803) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात येणार आहे.
तरी हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देणे आवश्यक आहे. हे आपले माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे