भडगांव – येथे भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष आण्णा मोरे यांच्या नेतृत्वात ईव्हीएम मशिन बंद करून निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 17 जून रोजी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पाचोरा रोड बुद्ध विहार येथून भडगांव तहसिल पर्यंत काढण्यात येऊन नायब तहसिलदार देवकर यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त रित्या मोर्चामध्ये “ईव्हीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ” च्या घोषणा देण्यात आल्या. या ई.व्ही.एम. मशीनमध्ये पुर्ण मतदानाध्ये शंका उत्पन्न होत असुन मतदानामध्ये अतंर असण्याचा संभव आहे असे नमुद केले आहे. बावीस निर्वाचीत क्षेत्रात ईवीएम मध्ये व उमेदवार मध्ये पुर्ण मतदान जास्त आढळुन आले आहेत. त्याची पुर्तता म्हणुन भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडिने पुराव्यासाठी वेबसाईटचा स्क्रीन शाॅट चुनाव आयोगला देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नितीमध्ये जनतेच्या मतदानाची पुर्णपणे चोरी झाल्याचे निदर्शनात आले आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनियमतता याबाबत निवडणूक आयोग वर गप्प का ? जनतेत संदेह निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पुन्हा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या आक्रोश मोर्चामध्ये तालुका अध्यक्ष आण्णा मोरे यांच्या नेतृत्वात व सम्राट वाघ कार्याध्यक्ष, भारिप, नितीन मोरे, युवा ता.अध्यक्ष भारिप, रवेण्णा खेडकर, प्रविण सोनवणे, विनोद अडकमोल, बहुजन मुक्ती पार्टी, हाजी जाकीर कुरेशी , भारत मुक्ती मोर्चा, शिवाजी माळी, संजय त्रिभुवणे, हरिश मोरे, बापु मोरे महिला कार्यकर्त्या आशाबाई मोरे, मंगलाबाई बागुल, कल्पनाबाई मोरे, विजयाबाई मोरे व वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.