देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनच्या पावसावर खरीप हंगाम घेतात. मात्र मान्सूनच्या आगमनाला जवळपास एका महिन्याचा काळ शिल्लक असून खरीप हंगाम देखील येत्या एका महिन्यात सुरू होणार आहे. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि शेतीसाठी पैशांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कपाशी या पिकाकरीता हेक्टरी साठ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.
यामुळे अमरावती जिल्ह्यात काही बँकांनी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप सुरू केले होते. दरम्यान राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी 1450 कोटी रुपयांचे लक्षाॅंक देण्यात आले आहे. आता आपण कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती कर्ज मिळणार याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.
हाती आलेल्या माहितीनुसार या खरीप हंगामासाठी बँकेच्या माध्यमातून कापूस (कोरडवाहू) ६० हजार, कापूस (बागायती) ७० हजार, ज्वारी – ३१ हजार, तूर – ४० हजार, सोयाबीन – ५१ हजार, सूर्यफूल -२७ हजार, उडीद- २४ हजार, गहू – ४२ हजार, करडई – ३४ हजार, हरभरा (जिरायती) – ४० हजार,
हरभरा (बागायत) – ४५ हजार, धान – ४५ हजार, कांदा – ७२ हजार, भाजीपाला – ४५ हजार, भुईमूग खरीप- ४२ हजार, भुईमूग (उन्हाळी)- ५० हजार, संत्रा- १.०५ लाख, केळी – १.१० लाख, ऊस – १.४५ लाख या दराने पीक कर्ज वाटप केले जाणार आहे.