जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही भागात बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.दरम्यान अशातच जळगाव तालुक्यतील धोबी वराड येथील एक थरारक घटना घटना समोर आलीय.४० वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. बिबट्या आपल्या जबड्यात मान पकडण्याच्या बेतात असतानाच बिबट्याला शेतकरी ताकदीने झटकून फेकतो. यावेळी आरडाओरड झाल्याने ग्रामस्थ येतात अन् बिबट्या पळ काढतो.
नेमकी काय आहे घटना?
धोबी वराड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय आशिष सुधाकर सुरळकर हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात होते. याचवेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. आशिष यांनी वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला उचलून पटकले. या प्रयत्नात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंज्याचा वार केला. त्यात त्यांच्या डोळ्याला, कानाला जबर जखम झाली आहे. आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. जखमी आशिष यांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
हे पण वाचा..
ग्राहकांनो संधी सोडू नका..! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजार रुपयांनी घसरले
महत्वाची बातमी! क्रेडिट-डेबिट कार्डवरून पैसे खर्च करण्याचे नियम बदलले
CRB चा कर्णधार डू प्लेसिसची पत्नी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पहा हे फोटो..
जखमी आशिष सुरळकर यांच्याकडून रुग्णालयात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सांगितले, की रात्री अकरा ते बाराच्या सुमारास लहू जाधव यांची शेतामध्ये बांधलेली पांढरी गाय याच बिबट्याने फस्त केली असून, महिन्यापूर्वी वासरूही पळवून नेले होते. धोबी वराड गावात बिबट्याची प्रचंड दहशत असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.