पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यातील 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे उकाडा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. अशातच हवामान खात्याने आता उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. IMD ने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे.
तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार
आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर जाताना छत्री स्कार्फचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.