पारोळा – राष्टीय महामार्ग व बायपास मार्गावरिल आर्थिक व तांत्रिक अडचणी दुर झाल्या आहेत.फागणे ते तरसोद पर्यतचे चौपदरीकरण लवकरच वर्षभरात पुर्णत्वास येऊन महामार्ग खड्डेमुक्त होऊन चकाचक होतील असा दावा करित तालुक्यात साठवण बंधार्यासाठी तीन कोटीचा निधी मंजुर झाल्याची माहीती खा.उन्मेष पाटील यांनी दिली, पालिकेत प्रथमच भेटी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष करण पाटील, मुख्खाधिकारी विजयकुमार मुंडे, चाळीसगावचे सभापती दिनेश बोरसे, सुरेंद्र बोहरा, भाजप तालुकाध्यक्ष अॅड.अतुल मोरे, नगरसेवक बापु महाजन, मनिष पाटील, भैय्या चौधरी, दिपक अनुष्ठान, गौरव बडगुजर, आशिष वाणी, कैलास पाटील उपस्थित होते. पालिकेच्या वतीने करण पाटील, विजयकुमारमुंडे यांचेसह नगरसेवकांनी खा.उन्मेष पाटील यांचे स्वागत केले.
खा.पाटील यांनी महामार्गाच्या कामासोबत गिरणा नदीवर लवकरच सात बलुन बंधारे काम मार्गी लावण्यात येणार असुन याबाबत जलशक्ती मंत्री शेखावत व केंद्रीय अध्यक्ष यांची भेट घेतली आहे. लवकरच कामास गती मिळणार सांगुन बर्याच दिवसापासुनचा प्रलंबित विषय मार्गी लागणार आहे.
एरंडोल-बहाळ राजमार्ग हा गेल्या 25 वर्षापासून मंजूर होता. परंतु तांत्रिक व फायनांशियल अडचणी निर्माण झाल्या. परंतु यावर मार्ग काढीत संबंधित अधिकार्यांच्या तीन बैठका घेत त्रुटीबाबत चर्चा करुन राजमार्ग एरंडोल-बहाळ रस्त्यासाठी 135 कोटी तर बहाळ सायगांव राजमार्गासाठी 135 कोटी असा 270 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती देत निविदा प्रकियेनंतर लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे सांगुन तालुक्याच्या जलसंधारणासाठी तीन कोटीचा निधी मंजूर करित यात जास्त क्षमतेची व उत्तम दर्जाची साठवण बंधारे तालुक्यातील विचखेडे, उंदीरखेडे व महाळपुर परिसरात बंधारेसाठी निविदा निघाल्याची माहीती खा.पाटील यांनी दिली.