बीड : महाराष्ट्रातील काही भागाला अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, यात बीड जिल्ह्यात गारपीटीने भर उन्हाळ्यात काश्मीरचं दर्शन झालं. तुफान बर्फवृष्टीने जिकडं तिकडं फक्त बर्फचं बर्फ..दिसून आला.
बीडच्या आष्टी तालुक्यातील अरणविहिरा गावासह परिसरातील अनेक गावात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पुन्हा राखरांगोळी झाली. उभ्या पिकांसह माती देखील वाहून गेली. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असल्याने संसार उघड्यावर आले आहेत. या गारपीटीने भर उन्हाळ्यात हिमाचलचं दर्शन झालं. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करणार असून तात्काळ शासनाला याचा अहवाल पाठवून दिला जाणार आहे अशी माहिती आष्टी तहसीलदार यांनी दिलीय
आष्टी तालुक्यातील अरणविहीरा गावातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याने आपल्या दीड एक्कर शेतात २२५० केळीचे झाडे लावले होते. यासाठी त्यांना जवळपास साडेतीन लाख खर्च केला. मात्र अवकाळी पावसासह गारपिटने सर्व केळी बाग उध्वस्त झाली. केळीचे जवळपास ३० लाख रुपये उत्पन्न मिळालं असतं. मात्र आता ८० ते ९० टक्के केळी बाग उध्वस्त झाली आहे. तर गावातील