जळगाव -शहरातील काव्यरत्नावली चौकात युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना मंगळवार दि.26 रोजी संध्याकाळी 6 वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, कॅप्टन मोहन कुलकर्णी, नगरसेविका ज्योती चव्हाण, फारूक शेख, अरवींद देशमुख, संग्रामसिह सुर्यवंशी, डॉ.विजय पाटील हे मान्यवर उपस्थित होते. युवाशक्तीचे सचिव अमित जगताप यांनी प्रस्तावनेत शहिद जवान आणि पोलिसांची माहिती दिली.यावेळी अशोक पारधे यांनी 26/11 हल्ल्यावर आधारित कविता सादर केली. यानंतर मेणबत्त्या प्रजवलीत केल्यावर शांतिमंत्र म्हणण्यात आला. यानंतर शहीद पोलीस व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशा फाउंडेशन, जी.एम.फाउंडेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, समाजचिंतामणी प्रतिष्ठान, काव्यरत्नवली जेष्ठ नागरिक या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जळगावकर नागरिक उपस्थित होते.
यावेळी पियुष हसवाल, सौरभ कुलकर्णी, शिवम महाजन, प्रकाश क्षीरसागर, गणेश सुर्यवंशी, हर्षल तेली, सागर सोनवणे, जयेश पवार, अलफैज पटेल, पियुष तिवारी,देवांग चौधरी, सुजाता बोरकर, मधुकर पाटील, प्रदीप पवार, वर्षा महाशब्दे आदींनी परिश्रम घेतले.