Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक

najarkaid live by najarkaid live
November 26, 2019
in राज्य
0
सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक
ADVERTISEMENT
Spread the love

नाशिक – राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नसून त्याचा परिणाम मागील भाजप सरकारच्या योजनांवर पहायला मिळत आहे. मागील भाजप सरकारची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना गुंडाळण्यात आली आहे. राज्यात सरकारच नसल्याने पुढील वर्षासाठी या योजनेअंतर्गत नवीन गावांची अद्याप निवड करण्यात आली नसून त्यासाठी आराखडा व आर्थिक नियोजन देखील करण्यात आले नाही. एकूणच जलयुक्त शिवार योजना गुंडाळण्यात आल्याचे समजते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती. त्या अंतर्गत जिल्ह्यात गावांची निवड करुन त्या ठिकाणी ‘पाणी आडवा व पाणी जिरवा’ ही संकल्पना राबविण्यात आली. पाणी साठविण्यासाठी मोठी अथवा मध्यम स्वरुपाची धरणे बांधण्याऐवजी छोटे व लघु बंधारे बांधून त्याद्वारे पाणी संचय करुन शिवार जलयुक्त करणे हा योजनेचा उद्देश होता. त्या माध्यमातून जमिनीची भूजल पातळी वाढविणे व महाराष्ट्र टँकरमुक्त करणे हे ध्येय होते.

या योजनेवर मागील चार वर्षात कोटयवधीचा निधी खर्च झाला. जिल्हा परिषद,आदिवासी विभाग, वनविभाग माध्यमातून जिल्ह्यात ही योजना राबविली जात होती. राज्यात अनेक ठिकाणी या योजनेला मोठया प्रमाणात यश आले. तर काही ठिकाणी निकृष्ट कामे व भ्रष्टाचारामुळे ही योजना सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखी ठरली. जिल्हयात देखील जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. मात्र, सद्यस्थितीत राज्यात सत्ता स्थापनेचे घाेंंगडे भिजत पडले आहे.

राज्याला नेतृत्व नसल्याने विकास कामे जवळपास ठप्प झाले आहेत. मागील सरकाच्या अनेक महत्वकांक्षी योजना आराखडा व निधी अभावी ठप्प पडल्या आहेत. पुढील 2020 – 2021 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून अद्याप जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावांची निवड झाली नाही. तसेच, या योजनेचा आर्थिक आराखडा देखील तयार करण्यात आला नाही. त्यात राज्यात सत्ता परिवर्तन झाले तर ही योजना बासनात गुंडाळली जाण्याची चिन्हे आहेत.

जलयुक्तची 120 कामे ठप्प
जलयुक्त शिवार योजनेंतअर्तगत मागील वर्षाच्या आराखड्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असली तरी 120 कामे सद्यस्थितीत ठप्प आहे. योजनेचे 45 कोटींचा निधी तसाच पडून आहे. अनेक बंधारे गाळमुक्त करुन त्यांची जलसंचय क्षमता वाढवायची आहे. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्याने या बंधार्‍यांमध्ये पाणी भरलेले आहे. पुढील मार्च महिन्यात त्यातील पाणी आटल्यानंतर गाळमुक्त व डागडुजीची कामे हाती घेतली जाणार आहे.

जिल्ह्यात जलयुक्तची 45 कोटींची 120 कामे ठप्प आहे. पुढील वर्षासाठी अद्याप शासनाकडून गावांची निवड झाली नसून आर्थिक आराखडा देखील आम्हाला प्राप्त झाला नाही.
– पल्लवी निर्मळ, रोहयो उपजिल्हाधिकारी


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा

Next Post

कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us