जळगाव : हवामान विभागाने राज्यात 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मागच्या 24 तासांता राज्यात विविध ठिकाणी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शेतकऱ्यांचे उरलेलं पीकही हातातून जाण्याच्या शक्यता आहे. कारण आज आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील काही भागात देखील रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लागली आहे. आज जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हे पण वाचा..
सर्वसामान्यांना आनंदाची बातमी! पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होणार?
सरकारने आणला मोठा नियम, आता ‘हे’ 10 अंकी क्रमांक होणार बंद..
आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता असून गरज असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.