जळगाव,(प्रतिनिधी)- खासगी कंपन्यांनी स्थानिक आदिवासींकडून बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी दि. १३ रोजी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगासमोर हजर राहून बाजू मांडणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.याप्रकरणात १८४ एकर जमिनीची छाननी करण्यात येत आहे.याप्रकरणी आदेश देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही कृती आराखडा सादर न केल्याने त्यांना समन्स बजावले होते.