मुंबई : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचाइ शारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावलं आहे.
हवामान खात्याने आजपासून ६ मार्चपर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा दिला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, प्रत्यक्षात सोमवार दिनांक ६ मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाबरोबरच गारपीट देखील होऊ शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पाऊसाचा जोर कमी असला तरी, गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.