चंद्रपूर : सामान्य तसेच गुन्हेगारीतल्या लोकांना अटक केलेली किंवा एकाद्या अधिकाऱ्याला अटक झालेल्या बातम्या वाचल्या असतील. पण जर एकाद्या संपूर्ण जिल्ह्याचा कारभारी अधिकारी असलेला जिल्हाधिकाऱ्याला जर अटक केली तर आर्श्चयच वाटेल. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचा आदेश निघाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मात्र ते आयोगापुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने त्यांना अटक करुन २ मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
हे पण वाचाच..
महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी.. शिवसेनेतून संजय राऊतांची केली जाणार हकालपट्टी?
जळगाव जिल्ह्यात जॉबची संधी.. महावितरण अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा
जळगाव जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; कुणाची कुठे झाली बदली? पहा
रेशनधारकांनो तुम्हालाही डीलर राशन देण्यास टाळाटाळ करतोय? मग ‘या’ नंबरवर करा तक्रार..
पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर ३६ वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आहे. या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.