नवी दिल्ली : तुमचे वाहन जर १५ वर्षापेक्षा जास्त वर्षाचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत १५ वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये रजिस्ट्रीमध्ये नूतनीकरण केलेल्या कारचाही समावेश असेल. या सर्व गाड्या नोंदणीकृत भंगार केंद्रावर नष्ट केल्या जातील.
या सर्व गाड्या नोंदणीकृत भंगार केंद्रावर नष्ट केल्या जातील. केंद्र सरकारचा हा नवा आदेश १ एप्रिलपासून लागू होणार आहे. केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश, नगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, शासकीय स्वायत्त संस्थेच्या मालकीच्या सर्व १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना भंगारात काढावे लागणार आहे. परंतु या नियमातून सैन्याच्या वाहनांना वगळण्यात आले आहे
हे सुद्धा वाचा..
धक्कादायक ! काकाने मित्रांच्या मदतीने केला दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार
फेसबुकवरची ओळख पडली महागात! भडगावच्या तरुणाने केला परराज्यातील महिलेवर वेळोवेळी अत्याचार
महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार ; हा पक्ष येणार सोबत, आज होणार घोषणा
अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागणार आहेत ; कसा कसेल आजचा दिवस तुमच्यासाठी
गेल्या वर्षभरापासून सुरू आहे तयारी
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मसुदा जारी केला होता, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारद्वारे वापरण्यात येणारी 15 वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करणे आवश्यक असल्याचं म्हटलं होत. हा नियम सर्व महामंडळ आणि परिवहन विभागाच्या बस आणि वाहनांना लागू होणार होता. त्यावर सरकारने सूचना आणि हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत दिली होती आणि आता हा नियम लागू होणार आहे.
दरम्यान हा नियम लागू झाल्यानंतर रस्त्यांवरून बरीच सरकारी जुनी वाहनं गायब झाल्याचं दिसणार आहे. प्रत्येक शहराच्या केंद्रापासून १५० किमीच्या आत किमान एक ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग सुविधा विकसित करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. यासोबतच ते म्हणाले की, संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशाचे वाहन स्क्रॅपिंग हब बनण्याची क्षमता देशात आहे.