जळगाव : राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच घसरला असून यामुळे थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, राज्यातील सर्वाधिक कमी तापमान जळगावात नोंदविले गेले आहे. जळगावचे किमान तापमान 5 अंशापर्यंत खाली आल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून आला.
याआधी जळगाव शहराचे किमान तापमान 2011 मध्ये 2 अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी जळगाव शहरात सर्वांत कमी म्हणजेच 5 अंशाची नोंद झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये जळगाव शहराचा पारा 5.2 अंशापर्यंत खाली घसरला होता.त्यानंतर आता 5 अंशापर्यंत खाली आले
यंदा हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात केवळ तीन ते चार दिवस पारा 10 अंशापेक्षा कमी झाला तर डिसेंबर महिन्यातदेखील बहुतांश ढगाळ वातावरण राहिल्यामुळे थंडी गायबच होती. मात्र, नवीन वर्षानंतर म्हणजेच 1 जानेवारीपासून जिल्ह्यात थंडीचे जोरदार कमबॅक झाले असून, जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी 10 अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षोत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही 13 अंश इतकी होती.
हे पण वाचा..
पत्नीला सोडून सरकारी कर्मचारी कॉल गर्लच्या प्रेमात पडला ; अन् मग.. पुढे काय झालं वाचा
राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी
मोठी बातमी : आमदार बच्चू कडू यांना दुचाकीने उडविले, रुग्णालयात उपचार सुरू
खुशखबर..! आता जनरलच्या तिकीटावर करता येणार स्लीपरमधून प्रवास ; जाणून घ्या काय आहे रेल्वेचा निर्णय
मात्र, यंदा ही सरासरी 3 अंशानी कमी झाली आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर देखील परिणाम होत असून, थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत, तसेच सकाळपासूनच शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तीव्र शीतलहरीची शक्यता येत्या 48 तासांत जळगाव जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना (Rabi Crop) फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. गहू , हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्वरीत उपाययोजना करण्याचे कृषी विभागानं आहवान केलं आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये कडाक्याचा थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.