मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचा हा व्हिडिओ ट्विट करून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या (bhagatsingh koshyari) मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख !
नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? pic.twitter.com/B7anekQ2q0— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 7, 2023
याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे, सुख काहीच नाही, असे राज्यपाल (bhagatsingh koshyari) म्हणाले. त्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.