मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुडण्युज आहे.केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्येच 38 टक्के दराने महागाई भत्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ देण्याचा विचारही राज्य शासनाने केला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. पहिली वाढ ही जानेवारी महिन्यात दिली जाते आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यात दिली जाते.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यात अनुज्ञेय करण्यात येणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे. यासाठी निधीची तरतूद शासन दरबारी करण्यात आली असल्याचे या मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.
निश्चितच जर जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळाला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक अशी बातमी राहणार आहे.