विजग्राहक हा घरगुती असो की कृषी पंप धारक यांना बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अनेकवेळा वाढीव वीज बिलाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर कधी कधी नवीन वीज कनेक्शन घ्यायचे असेल तरीदेखील बऱ्याचदा उशीर होतो. मात्र यामध्ये लक्षात घेण्यासारखे बाब म्हणजे आपण वीज वितरण कंपनीचे ग्राहक असल्यामुळे ग्राहक या नात्याने काही अधिकार प्राप्त होतात. त्या हक्कांच्या आधारे आपण येणाऱ्या समस्यांचे निराकरण करू शकतो या लेखामध्ये आपण वीज ग्राहक या नात्याने कुठले अधिकार प्राप्त होतात हे बघणार आहोत.
वीज ग्राहकांचे अधिकार
1- वीज मीटरमध्ये बिघाड झाल्यास कोणते अधिकार असतात?- बऱ्याचदा बसवलेल्या मीटर मध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात किंवा त्यामध्ये काहीसा बिघाड होतो. त्यामुळे ग्राहक या नात्याने संबंधित मीटर वीज वितरण कंपनीकडून चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे.
समजा चाचणी दरम्यान सदर मीटर हे सदोष किंवा खराब आहे असे आढळून आल्यास चाचणी शुल्क परत देण्यात येते व मोफत नवीन मीटर बसवून देणे ही कंपनीची जबाबदारी आहे. बऱ्याचदा मीटर जळाल्याची घटना घडतात. अशा परिस्थितीत जर ग्राहकाने मीटर जळाल्याची तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केली तर शहरी भागात 24 तासाच्या आत आणि ग्रामीण भागामध्ये 48 तासाच्या आत नवीन मीटर बसून विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी ही कंपनीचे राहते.
2- विज बिल वाढीव आले तर काय करावे?- ही समस्या बऱ्याचदा बऱ्याच ग्राहकांना येत असते. बऱ्याचदा अव्वाच्या सव्वा बिल येते. त्यामुळे ग्राहक कंपनीकडे तक्रार दाखल करतात. अशा परिस्थितीत बऱ्याचदा संबंधित ग्राहकाला बिल भरायला सांगितले जाते व नंतर तक्रार करा अशा पद्धतीचे सांगितले जाते.
हे पण वाचाच..
नवीन वर्षात सोने 62 हजार, तर चांदी 80 हजारांवर जाणार ; जाणून घ्या कारण??
नवीन वर्षात करोडो करदात्यांना आनंदाची बातमी ; आता उत्पन्नावर फक्त ‘एवढा’ कर लावला जाणार
लहान मुलीच्या भेटीकरिता निघालेल्या पित्याला ट्रकने चिरडले ; जळगावातील दुर्दैवी घटना
रेशन कार्डधारकांनो इकडे लक्ष द्या! सरकारने आजपासून मोफत रेशन योजनेत केला हा मोठा बदल
परंतु जे नियमित वीज बिल भरणारे आणि ठराविक बिल येते असे ग्राहक असतील अशांना जर अचानकच वाढीव बिल आले तर असे बिल भरण्यास कंपनीला सक्ती करता येत नाही. अशा परिस्थितीत मागील सहा महिन्यातील आलेल्या वीज बिलाची सरासरी काढून त्या सरासरी इतके बिल भरता येते. यालाच पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात.
अशा पद्धतीने बिल भरल्यानंतर कंपनीला ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करता येत नाही. तसेच यामध्ये विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 56 उपकलम (1) नुसार ग्राहकाला पेमेंट विथ क्लेम अर्थात निषेध बिल भरण्याची कायदेशीर तरतूद आहे.
3- ग्राहकाचे वीज कनेक्शन अचानक बंद करण्याचा कंपनीला अधिकार नाही– जेव्हा असे वाढीव बिलाच्या समस्या मध्ये ग्राहकाने पेमेंट विथ क्लेम म्हणजेच निषेध बिल भरल्यानंतर संबंधित विद्युत कंपनीकडून वाढीव बिल का आकारले गेले याचे कारण वीज ग्राहकास देणे ही कंपनीची जबाबदारी आहे व हा ग्राहकांचा अधिकार आहे.
बऱ्याचदा मुदतीमध्ये ग्राहकांना विज बिल भरता येत नाही. त्यामुळे कंपनीला अचानक विद्युत पुरवठा खंडित करता येत नाही. बिल न भरलेल्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याअगोदर संबंधित ग्राहकाला पंधरा दिवस अगोदर लेखी नोटीस देणे गरजेचे असते.
4- नवीन वीज कनेक्शनच्या बाबतीत असलेले अधिकार– नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाने अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत व ग्रामीण भागामध्ये दहा दिवसाच्या आत विद्युत वितरण कंपनीला ग्राहकाच्या जागेचे निरीक्षण करणे गरजेचे आहे व हा वीज ग्राहकाचा अधिकार आहे.
नवीन कनेक्शन साठी जो काही वीज जोडणी शुल्क दयावा लागतो त्याचा संपूर्ण तपशील शहरी भागासाठी पंधराव्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात विसाव्या दिवसापर्यंत कळवणे गरजेचे असते. नवीन वीज कनेक्शन साठी लागणारा अर्ज व लागणारी फी भरल्यानंतर संबंधित ग्राहकाला जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत विद्युत कनेक्शन सुरू करून देणे ही विद्युत वितरण कंपनीची जबाबदारी आहे.
तसेच कंपनीकडून प्रत्येक दोन महिन्यातून घरगुती मीटरची एकदा नोंद घेणे व कृषी मीटर साठी तीन महिन्यातून एकदा नोंद घेणे बंधनकारक आहे. घरगुती व कृषी ग्राहक यांना बिल दिल्याची तारीख व दंडाशिवाय बिल भरण्याची तारीख यामध्ये कमीत कमी दिवसांच्या अंतर असणे गरजेचे आहे. इतर ग्राहकांना हे अंतर 15 दिवसांचे असले पाहिजे. या प्रकारे ग्राहक या नात्याने ग्राहकांना अधिकार असतात. त्यामुळे या अधिकारांचा वापर ग्राहक हिताचे ठरते.