सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू करण्यात आला असून याबद्दल तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…गावाचा कारभार हाकणारा सरपंच आता शिक्षित असायला हवा, किमान ७ वी वर्ग पास असणारा उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढवू शकणार असा नियमचं सरकारने लागू केला आहे.
यंदा होतं असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पुन्हा सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने थेट लोकनियुक्त सरपंचपदाचा निर्णय रद्द करून, सदस्यांमधून सरपंच निवड बंद केली होती. मात्र सत्तानंतर झाल्यानंतर आता भाजप-शिवसेना शिंदे गटाने सरपंच निवडणूक पुन्हा जनतेमधून घेण्याबाबत निर्णय घेतला असल्याने निवडणूक लढताना उमेदवारांना किमान ७ वी वर्ग पास असणे आवश्यक आहे.
त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी आधी ७ वी पास आहे का, याचा विचार करूनच निवडणूक लढवा असाच नियम आता लागू करण्यात आला आहे. सरपंच पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला अर्जासोबत जन्मतारखेचा अन् ७ वी पास असल्याचा दाखला द्यावा लागणार आहे. जर हा दाखला व गुणपत्रक नसेल तर अशा उमेदवारांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढविता येणार नाही.