जळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सकाळीच सीमाप्रश्नावरून आक्रमक ट्विट केलं. महाराष्ट्राच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही, असं ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. त्यामुळे बोम्मई यांनी महाराष्ट्राला उघडपणे इशारा दिला. मात्र अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले ना.पाटील?
अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही, याचा अर्थ याला रगड म्हटल जातं… अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर निशाणा साधला.
हे सुद्धा वाचा…
शेतकऱ्यांनो सावधान ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता
भरदिवसा घरात घुसून 24 वर्षांच्या तरुणीचं अपहरण ; पाहा हा धक्कादायक VIDEO
जिल्हा दूध संघ निवडणूक ! गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आवाहन, म्हणाले..
जाणून घ्या बोरं खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे…
‘अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. आम्ही राज्यात एकत्र आहोत, भाजपचा अर्धा महाराष्ट्राने शिवसेनेचा अर्धा महाराष्ट्राचा होऊ शकत नाही आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची अस्मिता एकच आहे, असंही पाटील म्हणाले.