बुलढाणा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला. यानंतर नाशिकमधील सुरगणातील गावांनी गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला. आता अशातच बुलडाणा जिल्ह्यातील सीमेलगतच्या गावांनी मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा दिला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांना अनेक वर्षांपासून वीज, पाणी रस्त्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सातपुडा पायथ्याशी बसलेल्या काही आदिवासीबहुल समाज भागातील लोकही मध्य प्रदेशात जाण्याची मागणी करत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, गोमाल १, गोमाल २, चाळीस टपरी अशा या गावांची नावं आहेत.
कारण मध्य प्रदेशची सीमा इथून काही किलोमीटर अंतरावर आहे. आणि विकासासाठी ते मध्य प्रदेश सरकारकडे आपले डोळे लावून बसले आहेत. यामुळे सीमेलगतच्या गावांमुळे आधीच राज्य सरकारची डोकेदुखी असताना त्यात आणखी भर पडली आहे.
हे पण वाचाच..
नाचतानाचता महिलेचा गेला तोल, अन्.. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येत नाही
मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर अडविले, अन्… जळगाव जिल्हा हादरला
पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
दुकानावरून जाऊन येतो असे आईला सांगून गेला, पण ..जळगावातील धक्कादायक घटना
गावातील नागरिक उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देणार आहेत. हे सर्व गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर असून आदिवासी भागातील आहेत. कर्नाटकसोबतचा सीमावाद तापला असताना बुलडाण्यातील सीमेलगतच्या गावकऱ्यांनी मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा दिल्याने राज्य सरकार समोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे.