जळगाव : जळगाव पाचोरा रस्त्यावर भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जीवलग मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाला. रफिक हुसेन मेवाती आणि अरबाज जहांगीर मेवाती अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या दुर्दैवी घटनेनं अख्खं जळगाव हळहळलं आहे.
नेमकी काय आहे घटना?
रफिक आणि अरबाज हे दोघेही तरुण राणी बांबरुड, तालुका पाचोरा या गावचे रहिवासी होते. दोघे तरुण पेरू विक्रीचा व्यवसाय करतात, सोमवारी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच 19 सीएच 4359) रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय-२१) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते.
शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच 19 बीजे 2175) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती हे दोघे युवक जागीच ठार झाले.
हे पण वाचा..
ज्याच्यासाठी पती, चार मुले सोडली, त्यानेच.. अनैतिक नात्याचा झाला दुर्दैवी अंत
जळगाव महापालिकेत तब्बल 45000 रुपये पगाराच्या जॉबची संधी.. त्वरित अर्ज करा
सोने खरेदीची अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावले. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रूग्णालयात रवाना केले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह व मित्रपरिवाराने जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. जीवलग मित्रांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव शोकसागरात बुडालं. तर तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मेवाती कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.