जळगाव: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केल्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा पेटलं आहे. यावरून अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. अशातच आता शिंदे गटाचे सदस्य राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिला आहे.
नेमके काय म्हणाले ना.पाटील?
छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.
हे पण वाचा..
Navy Day: भारतीय नौदलाच्या शौर्याची कहाणी! पाकिस्तानच्या बंदरावर साजरी केली दिवाळी
एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली एकमेकांशी भिडल्या..VIDEO झाला व्हायरल
पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत मोठी बातमी ; उद्या इतक्या रुपयांनी स्वस्त होणार?
खाद्यतेलाचे भाव पुन्हा घसरले ; जाणून घ्या किती घसरले दर
जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल असून हा सरकारचा निर्लज्जपणा असल्याची टीका केली होती. या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. आदेश हे सरकारने काढले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेले नाहीत. ते विरोधक असल्याने माझ्यावर टीकाच करतील. माझी आरती करतील का? असा चिमटा त्यांनी काढला.