मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे. Sanjay Raut warns that there may be a split in Mahavikas Aghadi
महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देतानाच सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान आहे, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
हे देखील वाचा :
महाराष्ट्र हादरला ! 6 वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर वडिलांसह आजोबा, चुलत्याने केला बलात्कार
Free health checkup camp: जळगावात २० रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर भारत जोडो यात्रा महागाई, बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर सुरू असताना वीर सावरकर यांचा विषय काढण्याची गरज नव्हती. सावरकरांचा विषय काढल्याने फक्त शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसलाही धक्का बसला आहे असं राऊत म्हणाले. सावरकरांमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशाराही त्यांनी दिला.