जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचे वाद संपूर्ण जिल्ह्याला परीचित आहेत. खडसे-महाजन यांच्यात वारंवार वादविवाद होताना दिसतात. दोघे एकमेकांवर रोज आरोप प्रत्यारोप करत आहे. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केलाय. गिरीश महाजनांनी आपण निवडून यावे म्हणून आपले पाय धरले होते, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
“राजकारणात मी गिरीश महाजनांना मदत केली, आज मीच दुश्मन झालो”, असं सांगत खडसेंनी खंत व्यक्त केली. “जामनेरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जंगी सभा झाली होती. तेव्हा गिरीश महाजनांनी धावत पळत येऊन माझे पाय धरले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
“गिरीश महाजन यांच्यासाठी मी शत्रुघ्न सिन्हा यांची बोदवडला होणारी सभा जामनेरला घेतली. सोनिया गांधी यांच्या सभेपेक्षा ती सभा मोठी झाली म्हणून वातावरण बदललं आणि गिरीश महाजन निवडून आले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.