जळगाव,(प्रतिनिधी)-श्री. मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक व श्री. संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांद यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हयात १६ भरारी पथकांतील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांचेमार्फत कृषि सेवा केंदाच्या तपासण्या सुरू आहेत. दरम्यान, कृषि केंद्र चालकांनी निकृष्ठ दर्जाचे विद्राव्य खतांची विक्री करु नये असा इशारा कृषि विभागाने विजेत्यांना दिला आहे. तसेच कृषि निविष्ठा खरेदी करतांना शेतकन्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हयातील शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.
श्री. मोहन या विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक व श्री. संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव यांनी मे. श्री स्वामी कृषि केंद्र, एरंडोल या खत विक्री केंद्रातून मे. क्रिस्टल कॉर्पोरेशन, भरूच, गुजरात या कंपनीचे उत्पादित केलेले पाण्यात विद्राव्य खत १३:४०:१३ च क्र. CC-06 Sept. 2022 चा नमुना तपासणीसाठी घेतला असता, खत तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मोठ्या फरकाने अप्रमाणित झाला आहे.
त्यानुसार विक्रेत्याकडील उर्वरित साठयास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार बिक्री बंद आदेश देण्यात आले असून जिल्हयातील इतर खत विक्रेत्यांनी वरिल बॅच नंबरचे खतांची विक्री करू नये. तसे आढल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद सर्व कृषि सेवा केंद्रांनी घ्यावी. अशा सूचना श्री. मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांनी विभागातील सर्व निरीक्षकांना कारवाई करण्याच्या केल्या आहेत.