वर्धा ; नागपूरच्या वर्धा-बडनेरा विभागातील मालखेड आणि टिमटाळा स्थानकांदरम्यान 20 कोळशाच्या वॅगन्स रुळावरून घसरल्या. त्यामुळे या विभागावरील डाऊन आणि अप मार्गांवर परिणाम झाला आहे. या घटनेनंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, अनेक गाड्या वळवले गेले आणि शॉर्ट टर्मिनेट केले गेले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. कोणत्याही माहितीसाठी प्रवासी ०७१२-२५४४८४८ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे १५-२० डबे घसरले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजनसह रुळावरून घसरली. रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला.
एकापाठोपाठ रेल्वेचे 15 ते 20 डबे रुळावरून खाली घसरले. मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे. रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातामुळे आज नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अजणी-अमरावती
भुसावळ-वर्धा
नागपूर-मुंबई
नागपूर-वर्धा
नागपूर-पुणे
गोंदिया-मुंबई