नवी दिल्ली : देशात लव जिहादचा प्रकार वाढताना दिसत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून चॅटिंग, चॅटिंगमधून प्रेम आणि प्रेमातून लग्न असा सामान्य घटनाक्रम एका हिंदू मुलीच्या बाबतीत घडला. पण लग्नानंतर गरोदर राहिलेल्या या हिंदू मुलीला एका विशिष्ट समुदायातील असलेल्या मुलानं वाऱ्यावर सोडून दिलं. ही घटना बिहारच्या बेगूसरायमध्ये घडली असून हा लव जिहादसारखा खळबळजनक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
नेमकी काय आहे घटना?
समस्तीपूर जिल्ह्यात राहणारी चांदनी कुमारी बेगूसराय मधील एका मॉलमध्ये काम करते. जानेवारी 2020 मध्ये फेसबुकवर मैत्री करुन मोहम्मद आफताब आलम याने तिच्यासोबत संबंध ठेवले. अनेकदा तिचा गर्भपात करण्यास भाग पाडलं.
लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर मोहम्मदने चांदनीसोबत काली मंदिरात अखेर लग्न केलं. दोघं नवरा-बायको सारखे राहू लागले. अधेमधे मोहम्मद आपल्या गावी राहायला जायचा. जेव्हा चांदनीने तिला सासरी घेऊन जाण्याची विनंती केली, तेव्हापासून मोहम्मद फरार असल्याचं चौकशीतून समोर आलंय.
धक्कादायक बाब म्हणजे आता या मुलीकडे तिच्या माहेरच्या लोकांनाही पाठ फिरवली आहे. त्यांनीही मुलीला मदत करण्यास नकार दिलाय.
गरोदर तरुणी दोन महिन्यंपासून पोलीस स्थानकात ये-जा करतोय. पण ना कोणतीही तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आणि नाही कोणती कारवाई केली.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी ही पीडिता एसपी योगेंद्र कुमार यांच्या जनता दरबारात पोहोचली. त्यावेळी एसपी कुमार यांनी पीडित मुलीचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.